सातारा : शासनाने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’सह इतर योजना या फसव्या असून, शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसत आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी जाहीर केलेल्या योजना संपूर्ण राज्यात लागू होण्याबाबत शंकाच असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जकातवाडी (ता. सातारा) येथील एका कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

shinde shiv sena may not nominated mla yamini jadhav from byculla constituency for assembly election
भायखळ्याला यंदाही नवीन आमदार?
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
mahayuti likely to contest upcoming assembly elections under the leadership of cm eknath shinde
भाजप नेतृत्वाचे शिंदेंना झुकते माप? महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता
strict law to control bogus pathology labs says minister uday samant
बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत
Mumbai BMW Hit and run case latest update
Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

हेही वाचा >>> शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्याची मुभा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा

पवार म्हणाले, की सरकारचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सहा महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. मात्र, या वेळी राज्य सरकारने आठ दिवसांत पुरवणी मागण्या मांडल्या. त्यामुळे माझा असा अनुभव आहे, की राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या फसव्या आहेत आणि त्या पूर्ण राज्यभर लागू होऊ शकत नाहीत. राज्यात लोकसभेप्रमाणेच धक्कादायक निकाल लागतील. सगळीकडे सरकारविरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल.

आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या निवडणूक चिन्हांचा फटका बसला. साताऱ्यात विजय आमचाच होता. आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. मात्र, अनेक ठिकाणी तुतारीच्या विरोधात पिपाणी वाजवणारा माणूस निशाणी ठेवण्यात आली होती. त्याचा फटका आम्हाला बसला. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण या प्रश्नावर ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारकडून आज विधानसभेचे कामकाज झाले नाही असे माझ्या वाचण्यात आले आहे. त्यामुळे काही निर्णय झाला नाही.