मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी सकाळी राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले असून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानपरिषद सभापतींची निवडणूकही याच अधिवेशनात गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषित करण्यात यावी, यासंदर्भातही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. मात्र वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कमला मिलच्या रमेश गोवानी यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, ६७ कोटी फसवणूक केल्याचा आरोप

mahayuti likely to contest upcoming assembly elections under the leadership of cm eknath shinde
भाजप नेतृत्वाचे शिंदेंना झुकते माप? महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
bjp likely to contest 160 to 170 seats in maharashtra assembly election
विधानसभेसाठी भाजप १६०-१७० जागा लढवणार? शिंदे गटाच्या मागणीला अंकुश लावण्याची स्थानिक नेतृत्वाची मागणी
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा

राज्यपालनियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्यांचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून वादात अडकला आहे. महाविकास आघाडी सरकाने शिफारस केलेल्या १२ जणांची नियुक्ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नव्हती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर झाली होती. राज्यपालांच्या दिरंगाईबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत राज्यपालांना कर्तव्याची जाणीव करून दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नवीन नियुक्त्यांसाठी स्थगिती दिली होती. पण ती काही महिन्यांपूर्वी उठविण्यात आली होती.

हेही वाचा >>> कमला मिलच्या रमेश गोवानी यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, ६७ कोटी फसवणूक केल्याचा आरोप

आता उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका प्रलंबित असली तरी नियुक्त्यांसाठी स्थगिती नाही. विधानपरिषद सभापतींचे पदही दोन वर्षांपासून रिक्त असून याच अधिवेशनात निवडणूक घेण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे बारा आमदार नियुक्त्या व सभापती निवडणुकीसंदर्भातही राज्यपाल भेटीत चर्चा झाल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी नमूद केले. दरम्यान, विधानपरिषद सभापतींची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल बैस यांची भेट घेऊन केली, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.